No Video Available
No Audio Available
संसार हा एक व्यवसाय आहे.
संसारात सर्व काही हा एक व्यवहारच आहे.
कोणाची तरी इच्छा असते, कोणीतरी ती पूर्ण करते आणि त्यातून देवाणघेवाण होते – म्हणजेच व्यवहार घडतो.
तुम्हाला कशाची इच्छा आहे, याला काहीच महत्त्व नाही.
तुम्हाला पैसा, सौंदर्य, नाव, प्रसिद्धी, (सोशल मीडियावर) प्रेक्षकसंख्या, मित्र किंवा नातेवाईक – यांपैकी कशाचीही इच्छा असो, त्याने काही फरक पडत नाही.
इच्छा धरणे किंवा आकांक्षा बाळगणे, म्हणजेच संसार.
पण ध्यान मात्र वेगळे आहे.
ध्यान केवळ त्यांच्यासाठीच आहे ज्यांनी अशा सांसारिक प्राप्तींमधील निरर्थकता समजून घेतली आहे.
ध्यान म्हणजे रूपांतर; संसारी माणसाचे संन्याशात होणारे रूपांतर; इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तीचे इच्छा-रहित अवस्थेत होणारे रूपांतर.
जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यास आणि त्याग करण्यास तयार असते, तेव्हाच ध्यान यशस्वी होते.
जेव्हा सर्व इच्छा गळून पडतात, तेव्हा त्या व्यक्तीला उमजते की संसार हा केवळ एक भ्रम होता; आणि ज्या मूळ अधिष्ठानावर संसाराचे हे नाटक घडत होते, तेच सत्य आहे – एकमेव सत्य.
त्याच क्षणी त्याला परमानंदाचा अनुभव येतो; त्याचे संसारी माणसातून संन्याशात रूपांतर होते.
संन्यास हा ‘घेतला’ जात नाही (किंवा ‘दिला’ही जात नाही); तो ‘घडतो’.
x
जोपर्यंत तुम्ही पैसा, सौंदर्य, नाव आणि प्रसिद्धी यांना महत्त्व देता, तोपर्यंत तुम्ही धावत असता; तुमचे मन धावत असते आणि ध्यान तुमच्यासाठी नाही.
ध्यान म्हणजे विश्रांती.
धावणे आणि विश्रांती घेणे या गोष्टी एकाच वेळी घडू शकत नाहीत.
No Question and Answers Available